मुंबई : एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसून प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी विशेष अभियान राबवण्याची आत्यंतिक निकड निर्माण झाल्याचे नुकतेच महामंडळाने काढलेल्या मामाच परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत एसटी महामंडळ 'प्रवासी वाढवा अभियान' हाती घेणार आहे. या कालावधीत किमान दोन टक्के भारमान वाढवण्याचे उद्दिष्ट देताना कारवाईचा इशाराही महामंडळाने अधिकारी आणि चालक-वाहकांना दिला आहे. खासगी ट्रॅव्हल्सने निर्माण केलेली स्पर्धा, एसटीचे वाढत जाणारे भाडे, अस्वच्छ गाड्या, आगार आणि स्थानकातील गैरसोयी इत्यादींमुळे गेल्या काही वर्षांत एसटीची प्रवासी संख्या बरीच घटली. परिणामी उत्पन्न कमी होत गेले. त्यामुळे तोटाही वाढत गेल्याने कर्मचालांना वेतन देणेही कठीण झाले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकालांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रवासी व उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट दिले. त्यानंतर २१ फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रकच जारी केले आहे.
परिपत्रकानुसार एसटीच्या प्रवासी भारमानात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने घसरण होत आहे. मार्च २०१९ मध्ये प्रवासी मामाच भारमान ६४.७१ होते. मार्च २०२० मध्ये हेच उद्दिष्ट ६६.७१ टक्के देण्यात आले आहे. यात प्रवासी आणि उत्पन्नवाढ करणाला आगारांची निवड करून यामधील तीन आगारांना रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. उद्दिष्टापेक्षा सर्वात जास्त व सर्वात कमी उत्पन्न आणणाला तीन चालक आणि वाहक यांची नावे आगारातील फलकावर नमूद केली जाणार आहेत.