अधिकाऱ्यावर दिनांक ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा केला जात असतांनाच पालघर जिल्ह्यातील गुन्हेशाखा वसई युनिट च्या प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असलेल्या सिद्धवा जायभाय या महिला पोलीस अधिकाऱ्यावर मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या नॉ वेल्टी हॉटेल समोर ८:३० सायंकाळी वाजण्याच्या सुमारास बाईक वरून आलेल्या दोनअज्ञात इसमाने दोन गोळ्या झाडल्या आणि आरोपी पसार झाले आहेत. नालासोपारा कार्यलयातन आपले काम संपवन आपल्या सहकाऱ्यासोबत त्यांच्या खाजगी स्वीप्ट गाडीतून पालघरला घरी जात असताना त्या बर्गर घेण्यासाठी या हॉटेल ठिकाणी थांबले असतांना काळ्या रंगाच्या पल्सर नावाच्या दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञातहल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी जायभाय यांच्या दिशेने गोळीबार केला पण त्या गोळ्या गाडीच्या समोरील बोनेट वर लागल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरां विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांवर गोळीबार झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावघेतली . ज्या कारवर गोळीबार झाला ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून पंचनामा केला आहे. गोळीबार का केला गेला याचे कारण अद्याप कळालेले नसून आरोपी पकडले गेल्यानंतरच कारण स्पष्ट होईल अशी माहिती मिळते आहे. या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही हल्लेखोरानी झाडलेली गोळी गाडीच्या बोनेटवर लागली त्यामुळे जायभाय हया सुदैवाने बचावल्या आहेत.
'भारतीय महिलांना पडलाय संस्कृतीचा विसर' भाजपा नेत्यांकडून महिला दिनीच टीका
भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी जागतिक महिलादिनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. महिलांना आंमली पदार्थाच्या नशेत आंदोलन करण्यास भाग पाडलं जात आहे, असं वादग्रस्त वक्तव्य घोष यांनी केलं आहे. 'मागील काही दिवसांपासून घातक आंदोलने होताना दिसत आहेत. महिलांना आंमली पदार्थ देऊन आंदोलन करण्यास भाग पाडलं जात आहे. त्यामुळेच महिला दिवसभर घोषणा देताना दिसत आहेत. महिला आपली संस्कृती विसरल्या आहेत हेच यामधून दिसून येत आहे. चांगलं काय वाईट काय याचं भान महिलांना राहिलेलं नाही,' अशी टीका घोष यांनी आंदोलनकर्त्या महिलांसंदर्भात बोलताना केली आहे.