पारोळ : अवघ्या जगाला सध्या कोरोना विषाणूच्या भीतीने ग्रासले आहे. भारतातही महाराष्टढासह काही ठिकाणी या विषाणूने चांगलीच भंबेरी उडवलेली दिसते. वसई तालुक्याच्या किनारीपट्टीलाही कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच धक्का बसलेला दिसतो. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. येथील हॉटेल, रिसॉर्ट मालकांना या कोरोनाच्या दहशतीचा चांगलाच फटका बसला असून त्यांचा धंदा मंदावला आहे.
पूर्वी होळीच्या दिवसात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व्यवसायाला बरकत असे; पण यंदा होळीच्या दिवसात कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याचे रिसॉर्ट मालकांचे म्हणणे आहे.
एरवी वीकेण्ड तसेच अन्य दिवशी गजबजलेली हॉटेल्स, रिसॉर्ट कोरोना दहशतीमुळे ओस पडली आहेतया ठिकाणी पर्यटक आणि ग्राहक येण्यास धजावत नसल्याने त्यांचा धंदा मंदावला आहे. कोरोना व्हायरसमुळे येथील पर्यटनाला धक्का बसला आहे. पहिल्यांदाच वसईची पश्चिम किनारपट्टी पर्यटकांविना दिसते आहे. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवशी समद्रकिनारे पर्यटकांनी फलन जातात; पण कोरोनाच्या भीतीने . समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत आहेत.
__वसईच्या पश्चिम किनारपट्टील मिनी गोवा असे संबोधले जाते त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथून रोज हजारो पर्यटक या ठिकाण पिकनिकला येतात. चांगल्य पर्यटनामुळे इतकी वर्षे उत्तम व्यवसाय करणारे हॉटेल, रिसॉर्ट कोरोनामुळे मंदीच्या सावटाखाली गेले आहेत किनारपट्टीवर पर्यटकांसाठी खास उंट सवारी करणारे उंटवालेसुद्धा पर्यटकांर्च वाट पाहत आहेत. दिवसाला हजार हे बाराशे रुपये कमावत असताना आत केवळ २०० ते ३०० रुपये कमाई होत असल्याने तेही चिंतेत आहेत. प्रामुख्याने विरार, वसई, येथील अर्नाळा, कळंब, राजोडी, सुरूच बाग, पाचूबंदर, किल्लाबंदर येथे पर्यटकांची गर्दी असते.